Tuesday 17 December 2013


Published: Wednesday, December 4, 2013
अमाप पैसा, कोणताही विधिनिषेध नाही आणि काहीही केले तरी पाठीशी घालणारे राज्य नेतृत्व. यामुळे कलानी यांचा वारू चौखूर उधळला, त्यास अडवण्याची धमक एकाही राजकीय पक्षात नव्हती. अशा नतद्रष्टांमुळे महाराष्ट्रातील समाजजीवनाचा पुरता विचका झाला असून राज्यातील अनेक प्रांतांत स्थानिक गुंडपुंडांची सरंजामशाही तयार झाली आहे.
विधायक चेहऱ्याच्या राजकारण्यांनी पुढे आणलेल्या विध्वंसक चेहऱ्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणास गेली काही दशके ग्रासून टाकलेले आहे. यातील काहींनी पांढरे डगले चढवून वाल्याचे वाल्मीकी झाल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या आभासी वाल्मीकींमधून काही शिक्षणसम्राट झाले, काही खाणसम्राट तर काही बांधकामसम्राट बनले. यातील काहींना त्यांच्या टोळी-उद्योग काळाची आठवण करून दिल्याचेही लोकप्रतिनिधी सभेने पाहिले. यांच्याही पलीकडे राजकारण्यांचा एक वर्ग असा होता की त्यांनी कधी सभ्यतेचा आवसुद्धा आणण्याचा प्रयत्न केला नाही. अशा नामांकितांतील अग्रणी म्हणजे सुरेश ऊर्फ पप्पू कलानी. राजकीय प्रतिस्पध्र्याची हत्या केल्याप्रकरणी आज पप्पू कलानी यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. महाराष्ट्राचे बिहारीकरण व्हावे यासाठी ज्यांनी जीव तोडून प्रयत्न केले अशा बिनीच्या शिलेदारांत या पप्पूची गणना पहिल्या पाचात व्हावी. मुंबईजवळील उल्हासनगर हे यांचे कार्यक्षेत्र. परंतु त्यांच्या कर्तृत्वास भौगोलिक सीमांचे बंध कधीही अडवू शकले नाहीत. सत्तरीचे दशक हे अशा उपटसुभांसाठी महाराष्ट्रात अनेकार्थानी महत्त्वाचे ठरले. शिवसेनेसारखा नवा पक्ष जन्माला आलेला होता आणि गावगल्लीतील उनाडांच्या राजकीय आश्रयाची सोय त्यामुळे झाली होती. मुंबईसारख्या शहरांत त्याचे पडसाद उमटत होते. कामगार चळवळीस गुंडगिरी वा खंडणीखोरीचेच स्वरूप आले होते. राजकारणाचा फारच संकुचित अर्थ या काळात रूढ व्हायला लागला. आपापल्या जातीजमातींच्या मंडळींना एकत्र करून पुंडगिरी करणे असे घडू लागले. हे असे का करायचे? तर या झुंडशाहीच्या आधारे आपापल्या अनैतिक उद्योगांना झाकता यावे म्हणून. वसई परिसरातील ठाकूर, उल्हासनगर परिसरातील कलानी, भिवंडीचा जयवंत सूर्यराव ही अशा मंडळींची ढळढळीत उदाहरणे.
उर्वरित वाचण्यासाठी: 1 2 3

No comments:

Post a Comment